Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

एका मराठी गायकामुळे रफीसाहेब गाणं अर्धवट सोडून निघून गेले तेव्हा….

 एका मराठी गायकामुळे रफीसाहेब गाणं अर्धवट सोडून निघून गेले तेव्हा….
बात पुरानी बडी सुहानी

एका मराठी गायकामुळे रफीसाहेब गाणं अर्धवट सोडून निघून गेले तेव्हा….

by धनंजय कुलकर्णी 12/01/2022

हा किस्सा आहे सत्तरच्या दशकाच्या अखेरचा. दिग्दर्शक चेतन आनंद त्यावेळी ‘कुदरत’ हा चित्रपट बनवत होते. राजेश खन्ना, विनोद खन्ना, हेमामालिनी, प्रिया राजवंश आणि राजकुमार अशी तगडी यात स्टारकास्ट होती. चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपुरी आणि कतील सफई यांची होती, तर संगीत पंचम तथा राहुल देव बर्मन यांचे होते.  (m rafi)

मजरूह यांनी या चित्रपटासाठी लिहिलेले ‘हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते’ हे गीत किशोर कुमार आणि बेगम परवीन सुलताना यांच्या स्वरात होते. कतील सफई यांच्या लेखणीतून उतरलेले गाणे होते ‘दुख सुख की हरेक माला कुदरत ही पीरोती है’. पुनर्जन्मावर आधारित या सिनेमातील हे गाणे सिनेमाचे थीम सॉंग होते. 

चेतन आनंद यांना हे गीत म. रफीने गावे असं वाटत होते. गाण्यातील भावना रफीच्या स्वरात व्यवस्थित व्यक्त होतील, असं म्हणत त्यांनी पंचमकडे रफीच्या स्वराचा हट्टच धरला. त्यावेळी पंचमच्या डोक्यात हे गाणे मराठीतील गुणी गायक चंद्रशेखर गाडगीळ यांच्याकडून गावून घ्यायचे होते. या सिच्युएशन करीता तो स्वर फिट आहे असे त्यांना वाटत होते. पंचमला रफीच्या स्वराबाबत काही आक्षेप असण्याचे कारण नव्हतेच, पण या एवढ्या मोठ्या संस्थेच्या चित्रपटात केवळ एक गाणे गाण्यासाठी रफीला बोलावणे त्यांना प्रशस्त वाटत नव्हते. (m rafi)

पंचमने हर तऱ्हेने दिग्दर्शक चेतन आनंद यांना पटविण्याचा प्रयत्न केला, पण दिग्दर्शक रफीच्या नावावर कायम होते. शेवटी सुवर्णमध्य असा काढला गेला की, आधी हे गाणे चंद्रशेखर गाडगीळच्या स्वरात रेकॉर्ड करायचे आणि जर दिग्दर्शकाला नाही आवडले, तर रफीला बोलवयाचे. पंचमने चंद्रशेखर गाडगीळला तशी कल्पना दिली आणि गाण्यात पूर्ण प्राण ओतून गायचा सल्ला दिला. (m rafi)

चंद्रशेखर गाडगीळ तोवर फक्त मराठीत गात होते. त्यांना पहिलेच गाणे पंचमकडे गायला मिळत होते ही फार मोठी संधी होती. या रेकॉर्डिंगच्या वेळी दस्तूरखुद्द ‘कतील सफई’ उपस्थित होते. गाडगीळ यांनी अतिशय अप्रतीमरित्या ते गाणे गायले. पंचम देखील खूष झाले. आता प्रश्न होता दिग्दर्शकाला ते गाणे पसंत पडण्याचा! 

पंचमने चेतन आनंद याना गाणे ऐकवले. ते म्हणाले ‘गाना तो ठीक है लेकीन हम लोग रफी से ही गवाते है’. झालं…. हाती आलेली संधी वाया गेली, असं गाडगीळ यांना वाटलं. पण करणार काय? पुढच्या आठवड्यात रफी साहेब रेकोर्डिंगला आले. 

गाण्याच्या पहिल्या तीन कडव्यांचे रेकोर्डिंग झाले. आता फक्त शेवटचा अंतरा राहिला होता. त्यावेळी टी ब्रेक झाला. चहापानानंतर पुन्हा ते सिंगर रूम मध्ये गेले. तोच त्यांच्या कानावर एक कुजबूज ऐकू आली. ‘ये गाना पूना के दाढी वाले ने भी अच्छा गाया था.’ रफी साहेबांना हे ऐकून आश्चर्य वाटले.  त्यानी हेडफोन बाजूला काढला आणि एका म्युझिशियनला विचारले, “क्या ये गाना मुझसे  पहले किसी और की आवाज में रेकॉर्ड किया है क्या?” त्याने कोपऱ्यात उभ्या असलेल्या चंद्रशेखर गाडगीळ यांच्याकडे बोट दाखवीत “इनकी आवाज में रेकॉर्ड किया है’ असे सांगितले. (m rafi)

रफी सिंगर रूम तडक मधून बाहेर आले आणि पंचमदाला म्हणाले “पंचमदा, क्यूं किसी नये कलाकार का करीयर मेरे हाथोसे बरबाद करते हो?” आणि ते गाणे अर्धवट सोडून ते तसेच निघून गेले. 

गाण्याचे अखेरचे कडवे ते गायलेच नाहीत.  गायक चंद्रशेखर गाडगीळ यांच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. रफी साहेबांचा ग्रेटनेस हा असा होता. खुदा का नेक बंदा! पण आता पुन्हा पेच निर्माण झाला. चित्रपटात गाणे घ्यायचे ते कुणाचे? रफीचे की चंद्रशेखर गाडगीळ यांचे? पंचम दानेच यावर तोडगा काढला. (m rafi)

हे ही वाचा: किस्सा ‘गाता रहे मेरा दिल‘ गाण्याच्या ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्रीचा!

मेरा नाम जोकर – एक शापित गंधर्व (Mera Naam Joker)

सिनेमात हे गाणे टायटल चालू असताना रफीच्या स्वरात ऐकायला मिळते. पण रेकॉर्डवर चंद्रशेखर गाडगीळ यांचा स्वर ऐकायला मिळतो. यामुळे रेडिओवर गाडगीळ यांच्या स्वरातील गीत लोकप्रिय ठरले.  गाडगीळ यांच्या संगीतमय कारकिर्दीला मोठा ब्रेक मिळाला. आयुष्यभर ते रफीचे ऋणी राहिले! ‘शापित गंधर्व’ हे चंद्रशेखर गाडगीळ यांनी लिहिलेले पुस्तक वाचकांमध्ये चांगले लोकप्रिय झाले होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity Entertainment Song
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.