
Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna म्हणाला, ”माझ्या बायकोला…”
टीव्ही रिअॅलिटी शो “Bigg Boss 19” चा विजेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) सध्या चर्चेत आहे. त्याने फक्त ट्रॉफीच जिंकली नाही, तर शोमध्ये 50 लाख रुपयांचे बक्षीस देखील आपल्या नावावर केलं आहे. शोमध्ये भाग घेत असताना गौरवने आपला शांत आणि सभ्य स्वभाव कायम ठेवला. त्याच्या खेळाची एक खास बाब म्हणजे त्याने आपल्या प्रत्येक स्ट्रॅटजीसाठी खूप विचार केला, पण कधीही तो थेट याबद्दल कुणाला माहिती देत न्हवता. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याला “बिग बॉस 19” शो जिंकताना काहीही संघर्ष न करता मोठं यश मिळालं. गौरव खन्ना सध्या आपल्या विजयाचा आनंद साजरा करत आहे आणि त्याने सांगितले की, तो या जिंकल्याबद्दल उत्साही आहे. (Gaurav Khanna)

त्याला विचारण्यात ही आल होत की तो जिंकल्याला पैशाच काय करणार? तेव्हा गौरवने सांगितले की त्याने 50 लाख रुपयांचे बक्षीस कसे खर्च करायचं याबद्दल अद्याप ठरवलेले नाही. पण, त्याने असेही सांगितले की या पैशांचा वापर तो चांगल्या योजना किंवा गुंतवणुकीसाठी करेल. “माझ्या पत्नीला घेऊन कुठेतरी छान गॅटवे प्लान करू इच्छितो. आम्ही फार कमी वेळा एकत्र प्रवास केला आहे. या वेळेस, मी काहीतरी विशेष करण्याचा विचार करत आहे,” असं ही गौरवने सांगितलं.

गौरव खन्नाला शो दरम्यान अनेक वेळा त्याच्या सह-स्पर्धकांकडून आरोपांसमोर जावं लागलं. काही लोकांनी त्याला खोटं म्हणालं, पण गौरवने त्यावर शांतपणे उत्तर दिलं. “माझ्यावर त्यांचं आरोप करणे काही फरक पडत नाही. मी आपले काम उत्तम रीतीने केले आहे. माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद,” असं गौरव म्हणाला. त्याने स्पष्टपणे सांगितले की,15 आठवड्यांमध्ये 15 लोकांशी वाद घालणे त्याच्या कामाचा भाग नव्हता. त्याचा मुख्य उद्देश शोच्या बाहेर असलेल्या 1.5 अब्ज लोकांशी संबंध साधण्याचा होता.(Gaurav Khanna)
=============================
=============================
गौरवने सलमान खानसाठी विशेष आदर व्यक्त केला. त्याने सांगितले की, सलमान खानच्या मार्गदर्शनामुळेच त्याला “बिग बॉस” शोमध्ये भाग घेण्याची प्रेरणा मिळाली. “मी सलमान सरांचा प्रचंड चाहता आहे. जेव्हा मी ऐकले की सलमान सर या सीझनमध्ये सूत्रसंचालन करणार नाहीत, तेव्हा मला खूप दु:ख झालं. पण नंतर टीमने सांगितलं की सलमान सर शो करणार आहेत, आणि मी लगेचच शोमध्ये भाग घेण्यास होकार दिला,” असे गौरव म्हणाला. त्याला सलमान खानला भेटण्याची संधी मिळाल्यामुळे त्याच्या आनंदाची सीमा राहिलेली नाही.