Madhubala मुंबईच्या मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Anushka Sharma ५०० कोटी क्लबमध्ये चित्रपट देऊनही आता बॉलिवूडपासून आहे लांब!
अथक परिश्रमानंतर १८ वर्षांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) RCBने IPL मॅच जिंकली. क्रिकेटच्या मैदानात खाली बसून विराटच्या डोळ्यातील आनंदाश्रू सारं काही सांगून गेले. शिवाय दर मॅचप्रमाणे या देखील मॅचनंतर विराटने अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिला मारलेली मिठी जरा स्पेशलच होती. अनुष्का शर्मा हिने तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दित अनेक सुपरहिट चित्रपट दिले, विशेष म्हणजे ५०० कोटींच्या क्लबमध्ये तिचे चित्रपट सामिल झाले आणि बॉलिवूडमधल्या तिनही खान्स सोबत तिने स्क्रिन शेअरही केली. मात्र, सध्या अनुष्का चित्रपटांपासून दूर असून पती आणि मुलांसह वैयक्तिक जीवन एन्जॉय करतेय… जाणून घेऊयात अनुष्काच्या प्रवासाबद्दल….(Bollywood actress Anushka sharma)

अनुष्का शर्मा हिचा जन्म अयोध्येत झाला. वडिल आर्मी ऑफिसर असल्यामुळे शिस्तप्रिय वातावरणात अनुष्का लहानाची मोठी झाली. पुढे २००७ मध्ये फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्ससाठी पहिली मॉडेलिंग असाइनमेंट अनुष्काला मिळाली आणि मॉडलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत आलेल्या अनुष्का हिला थेट पहिल्यांदाच यशराज फिल्म्सचा चित्रपट मिळाला. एका मुलाखतीमध्ये अनुष्का शर्मा हिने तिच्या पहिल्या ‘रब ने बना दी जोडी’ (२००८) या चित्रपटाचा किस्सा सांगितला होता. ती म्हणाली की, “माझ्या घरी एक काचेचं कासव आहे. असं म्हणतात की आपली इच्छा एका कागदात लिहून त्या कासवाखाली ठेवायची आणि ती पुर्ण होते. ज्यावेळी मला माझा पहिला चित्रपट मिळाला त्यावेळी माझ्या आईने मला तिने त्या कासवाखाली ठेवली एक चिठ्ठी दाखवली आणि त्यात तिने चक्क लिहिलं होतं की माझ्या मुलीला पहिला चित्रपट यशराज फिल्म्सचा मिळू दे. आणि तसंच झालं”.(Rab Ne Bana Di Jodi Movie)
================================
हे देखील वाचा: Prajakta Mali : “तिने कशालाच हद्दपार…”, प्राजक्तानं केलं आलिया भट्टचं कौतुक
=================================
तर, ‘रब ने बना दी जोडी’ चित्रपटानंतर अनुष्काने ‘बॅंड बाजा बारात’ ‘बदमाश कंपनी’, ‘पटियाला हाऊस’, ‘जब तक है जान’, ‘मटरु की बिजली का मन डोला’, ‘पीके’, ‘सुलतान’, ‘दिल धडकनें दो’, ‘सुई धागा’, ‘झिरो’ असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट केले. शिवाय ‘NH10’ चित्रपटात अभिनयासह तिने निर्मात्याचीही जबाबदारी सांभाळली. शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान 9Salman Khan) आणि आमिर खान(9Amir Khan) या तिनही खान्स सोबत काम करणाऱ्या अनुष्का शर्माच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. (Bollywood)

अल्पावधीतच बॉलीवूडच्या तमाम नव्या-जुन्या ‘ए-लिस्टर’ अभिनेत्यांसोबत काम करून तिने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील असलेलं हे नाव या फिल्म इंडस्ट्रीत अजूनही नेपोटीझमऐवजी टॅलेंटला प्राधान्य मिळत असल्याची साक्ष देतं. तिने टीव्हीवर झळकण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी धडपड करून स्वतःची दुनिया निर्माण केली. सध्या बॉलिवूडपासून अनुष्का शर्मा जरी दूर असली तरी तिची चर्चा मात्र कायम पेज ३ वर आणि सोशल मिडियावर असतेच. (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News