Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Balraj Sahani यांना पान वाल्याने का हाकलून दिले?
बलराज सहानी हे अभिनेत्यांचे अभिनेते होते. त्यांच्या अभिनयाचे एक वैशिष्ट्य असं होतं की जी भूमिका ते करत ते त्या भूमिकेत पूर्णपणे विरघळून जात. प्रत्येक भूमिका त्या व्यक्तिरेखेशी समरस होऊन करत असत. म्हणजे श्रीमंतांची भूमिका करताना ते श्रीमंत वाटायचे तर गरीब लाचार अशी भूमिका करताना ती तसेच वाटायचे. ‘सीमा’, ‘वक्त’, ‘हमराज’, ‘हकीकत’ , ‘हंसते जख्म’, ‘संघर्ष….’ त्यांची प्रत्येक भूमिका वैशिष्ट्यपूर्ण असायची. त्यांच्या आत्मचरीत्रामध्ये त्यांनी चित्रपट शूटिंगच्या दरम्यान घडलेल्या अनेक प्रसंगांना उजाळा दिला आहे. (Bollywood news)

१९५४ साली बिमल रॉय दिग्दर्शित ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटात त्यांनी रंगवलेला शंभू महातो त्यांच्या आयुष्यातील एक सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक होता. या चित्रपटात त्यांना कलकत्त्याच्या रस्त्यावर हाताने ओढायची रिक्षा चालवायची होती. त्यांनी त्यासाठी रिक्षावाल्यांच्या सोबत राहून भरपूर प्रॅक्टिस केली, त्यांचं बोलणं चालणं, त्यांची कपडे घालण्याची शैली, त्यांची एकूणच देहबोली याचा सखोल अभ्यास केला. बलराज सहानी हे अतिशय उच्चशिक्षित होते. गोरे पान होते. देखणे होते. या तिन्ही प्लस पॉइंट असलेल्या बाजू ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटासाठी खरंतर अतिशय मारक अशा होत्या. कारण त्या काळातील रिक्षा ओढणारे रिक्षा चालक हे गावाकडून आलेले अशिक्षित, गावंढळ, मळके कपडे घातलेले, अस्ताव्यस्त केस असणारे, दरिद्री आणि उन्हात रापलेल्या चेहऱ्याचे लाचार दिसत असत. त्यामुळे बलराज सहानी यांना एक भीती होती की ‘आपलं देखणं रूप या भूमिकेला मारक ठरते की काय?’ म्हणून त्यांनी स्वतःलाच टेस्ट करायचं ठरवलं.(Bollywood tadaka)

एकदा या चित्रपटातील भूमिकेचा पेहराव तसाच ठेवून ते बाहेर पडले, त्यांनी टिपिकल रिक्षावाल्याचा पेहराव केला होता . चेहऱ्याला थोडासा काळा रंग लावल्यामुळे आणि उन्हात चालत गेल्यामुळे भरपूर घाम त्यांच्या चेहऱ्यावर आला होता. गळ्यात रिक्षावाल्यांसारखा गमछा होता. अशा अवतारामध्ये ते एका पान वाल्याकडे गेले आणि बाजूला एका कोपऱ्यात अंग मोडून उभे राहिले. गर्दी कमी झाल्यानंतर ते पानवाल्याला टिपिकल खेडूत भाषेत म्हणाले,” हे भैया, तनिक सुनो ना..एक पाचसो पचपन सिग्रेट का डिब्बा दही दवाना!” (Entertainment)
========
हे देखील वाचा : सस्पेन्स म्युझिकल हिट ‘बीस साल बाद’ आठवतो का?
========
पानवाल्याने बलराज सहानीला आपादमस्त न्याहाळलेआणि त्याला फाटका रिक्षावाला पाचसो पचपन सारखं महागण सिगारेट कसं काय मागतो? पानवाल्याने चक्क त्याला हाकलून लावले आणि कुत्सित स्वरात म्हणाला,”अबे जा जा… जेब में फुटी कौडी नाही और ठाठ देखो साहबजादे के पाचसो पचपन सिग्रेट पिने चले.. हैसीयत है क्या.. अबे हट “ असे म्हणत पानवाल्याने त्याला चक्क हाकलून लावले. पानवाल्याने केलेला अपमान बलराज सहानी यांना एखाद्या अवॉर्ड सारखा वाटला. त्यांनी विचार केला जर हा पानवाला मला इतक्या जवळून मला ओळखू शकत नसेल आणि मला फाटका रिक्षावालाच समजात असेल तर प्रेक्षक मला नक्कीच एक्सेप्ट करतील!” आणि झाले हि तसेच. बलराज सहानी यांनी ‘दो बिघा जमीन’ मध्ये रंगवलेला शंभू महतो त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील आयकॉनिक रोल ठरला.(Blaraj sahani movies)

बिमल रॉय दिग्दर्शित ‘दो भीगा जमीन’ हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण सिनेमा होता. या चित्रपटाला पहिल्या फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शन मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते. देशात आणि परदेशात या चित्रपटाने समीक्षकांची पसंती मिळवली. अनेक पारितोषिके पटकावली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘दुई भीगा जोमी’ आणि संगीतकार सलील चौधरी यांच्या ‘रिक्षावाला’ या लघुकथेवर हा चित्रपट आधारित होता. बलराज सहानी यांना या चित्रपटातील ही भूमिका मिळताना देखील बिमल रोय यांनी त्यांचं देखणं रूप पाहून त्यांना आधी ही भूमिका नाकारली होती पण बलराज यांनी के ए अब्बास यांच्या ‘धरती के लाल’ या चित्रपटात मी अशीच भूमिका केली आहे” हे सांगितल्यानंतर त्यांची शंभू महतो या भूमितीसाठी निवड झाली! (Do Bigha Zamin movie)