‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Manisha Koirala :’बॉम्बे’चित्रपटातील ‘ते’ गाणं कसं झालं शुट?
भारतीय चित्रपटसृष्टीत कल्ट क्लासिक चित्रपटांची यादी मोठी आहे…या यादीत दिग्दर्शक मणी रत्नम (Director Mani Ratnam) यांचे बरेच चित्रपट आवर्जून उल्लेखले गेले पाहिजेत… त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘बॉम्बे’ (Bombay Movie) चित्रपट हा त्यांच्या करिअरमधला बेस्ट सोशल इश्यु मांडणारा चित्रपट ठरला होता… Inter-Relegious विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाने समाजात विशेष ठसा उमटवला होता… अरविंद स्वामी आणि मनीषा कोयराला (Manisha Koirala) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटातील तु ही रे हे गाणं आजही प्रत्येकाच्या ओठांवर कायम असतंच… ए.आर.रेहमान यांचं संगीत आणि हरिहरन व कविता क्रिश्नमुर्थी यांच्या सुमधूर आवाजातील हे गाणं अक्षरश: एका वेगळ्याच जगात घेऊन जातं… पण तुम्हाला माहित आहे का या गाण्यासाठी मनीषा कोयराला हिला फार त्रास सहन करावा लागला होता… काय आहे किस्सा जाणून घेऊयात…(Bollywood)

चित्रपटांच्या शुटींगवेळी कलाकारांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो… शुटींग करताना त्यांना दुखापतही होते; पण या सगळ्यांना सामोरं जात आपला परफॉर्मन्स उत्कृष्टच झाला पाहिजे असं प्रत्येक कलाकाराचं म्हणणं असतं.. ‘बॉम्बे’ चित्रपटातील ‘तु ही रे’ गाणं शुट करताना मनीषा कोयराला हिला जंगलात शुट करताना पायाला दुखापत झाली होती. शुटींगला किस्सा मनिषाने सांगताना म्हटलं की, “जळूंनी भरलेल्या जंगलात तु ही रे गाण्याचं शुटींग सुरु होतं.. या गाण्याचं दोन ठिकाणी शूटिंग करावं लागलं आणि दोन्हीही ठिकाणं अत्यंत कठीण होती. एक ठिकाण डोंगरकड्यावर होतं आणि त्या डोंगरावर समुद्राच्या लाटा जोरदार आदळत होत्या, त्यामुळे मोठमोठे पाण्याचे तवंग उडत होते. हे खूपच धोकादायक होतं. पण तरीही आम्ही त्या ठिकाणी शूटिंग केलं आणि ते योग्य प्रकारे पार पडलं.”(Entertainment News)

पुढे मनीषा म्हणाली की, “दुसरं ठिकाण… मला माहिती नाही तो नक्की कोणता भाग होता, पण आम्ही घनदाट जंगलात होतो आणि ते जंगल पूर्णपणे जळूंनी भरलेलं होतं. थोडंसंही पुढे चाललं, तरी पायाला लगेच जळू लागायच्या. त्या गाण्यासाठी मला निळ्या रंगाचा स्कर्ट घालून जंगलात धावावं लागलं होतं. ते जंगल जळूंनी भरलेलं होतं, त्यामुळे खूप त्रास झाला. पण आम्ही अशा कठीण परिस्थितीतही कसं पुढे जायचं, हे शिकून चित्रिकरण पुर्ण केलं.”(Bollywood Tadaka)
================================
हे देखील वाचा: ‘या’ कारणामुळे काजोलने नाकारला चक्क मणीरत्नमचा चित्रपट!
=================================
दरम्यान, मनीषा कोयराला हिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले असले तरी २०१८ मध्ये आलेल्या संजू चित्रपटानंतर ती गायब झाली होती… काही अॅड्समध्ये जरी काम करत असली तरी तिच्या ताकदीची कलाकृती तिला ऑफर झाली नव्हती… मात्र पहिल्यांदाच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मनिषाला हिरामंडी प्रोजेक्टसाठी विचारलं आणि या क्लासिक वेब सीरीजमध्ये मनीषा झळकली… विशेष म्हणजे १९९६ साली आलेल्या खामोशी या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटानंतर मनीषा कोयराला हिने जवळपास २८ वर्षांनंतर भन्साळीसोबत काम केलं होतं… ‘खामोशी’ चित्रपटातील सलमान खान (Salman Khan) आणि मनिषावर चित्रित झालेलं ‘बाहों के दरमियाँ’ हे गाणं आजही बेस्ट रोमॅंटिक गाणं म्हणून अजरामर आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi