Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज लाईफ होती धोक्यात!
९०चं दशक गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या (Karishma Kapoor) एक्स नवऱ्याचं संजय कपूरचं (Sunjay Kapoor) ह्रदयविकाराच्या झटक्याने १३ जून २०२५ रोजी निधन झालं. वयाच्या ५३ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला असून संपूर्ण सिनेइंडस्ट्री करिश्माच्या दु:खात सहभागी आहे. खरं तर दोविंदा, सलमान, शाहरुख यांच्यासोबतीने इंडस्ट्री गाजवणारी करिश्मा कपूर संजय कपूरसोबत ल्गन केल्यानंतर चित्रपटांपासून दूर गेली होती. २००३ मध्ये सुरु झालेला त्यांचा संसार मात्र काही वर्षांनी मोडला. असं म्हणतात की बॉलिवूडच्या इतिहासातील करिश्मा कपूरचा घटस्फोट सर्वात महागडा होता. इतंकच नाही तर करिश्माला संजयने मानसिकरित्या फार छळलं होतं. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात…(Bollywood latest news)

तर, २००३ मध्ये करिश्मा कपूर हिचं लग्न बिझनेसमन संजय कपूर याच्याशी फार थाटामाटात झालं होतं. मात्र, लग्नाच्या १३ वर्षांनी दोघांनी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आणि २०१६ मध्ये ते विभक्त झाले. दोघांना दोन मुलं असून घटस्फोटानंतर त्यांनी कस्टडी करिश्मा कपूर हिला मिळाली. लग्न झाल्यानंतर काही वर्ष सुखात असणाऱ्या करिश्मा-संजयमध्ये नंतर दुरावे येऊ लागले. त्यांच्या नात्यात फार अडचणी निर्माण झाल्या होत्या. घटस्फोटावेळी करिश्माने संजय कपूरवर गंभीर आरोप केले होते. ज्यात तिचा शारीरिक, मानसिक छळ, ते अगदी मित्रांसोबत संबंध ठेवण्यास तिला प्रवृत्त करण्यापर्यंत तिने आरोप केले होते. (Karishma Kapoor and her married life)

दरम्यान, काही मिडिया रिपोर्ट्सनुसार करिश्माने संजय कपूरवर आरोप केला होता की, त्याने हनिमूनला गेल्यावर तिचा लिलाव केला होता. करिश्माने दावा केला होता की, संजय तिला त्याच्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडलं होतं. इतकंच नाही तर करिश्माने संजय आणि त्याच्या आईविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटालाही दाखल केला होता. अखेर या सगळ्या आरोप-प्रत्यापोरानंतर संजय आणि करिश्मा यांचा घटस्फोट झाला होता. (Bollywood gossip)
================================
हे देखील वाचा: Aishwerya Rai : ऐश्वर्याने नकार दिलेल्या चित्रपटामुळे करिष्मा कपूर झाली सुपरस्टार!
=================================
मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे करिश्माचा सर्वात महागडा घटस्फोट या कारणासाठी होता कारण तिने संजय कपूरकडून मोठ्या रकमेची पोटगी घेतली होती. तसेच, संजय कपूरने खारमधील आलिशान घर करिश्माच्या नावावर केलं होतं. याशिवाय, संजयकडून करिश्माला दर महिना लाखो रुपये खर्चासाठी दिले जात होते. घटस्फोटानंतर मुलांची कस्टडी करिश्माकडे असूनही तो त्यांच्या संगोपनासाठी लाखो रुपये खर्च करत होता आणि त्यांच्या खर्चासाठी त्याने जवळपास १४ कोटींचा बॉंड केला होता.(Entertainment tadaka)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marath