Madhubala मुंबईच्या मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

‘एक… दो… तीन’ ते मोहिनी पर्यंतचा प्रवास: Madhuri Dixit च्या स्टारडमचा खास किस्सा!
Madhuri Dixit: बॉलीवूडच्या चकमकचमीत दुनियेत एका गाण्याने आयुष्यच बदलून टाकलं…आणि त्या गाण्याचं नाव होतं ‘एक दो तीन’. या गाण्याच्या तालावर ज्या अभिनेत्रीने देशाच्या आणि जगाच्या हृदयावर राज्य सुरू केलं, ती म्हणजे माधुरी दीक्षित. तेजाब या चित्रपटापूर्वी माधुरी काही चित्रपटांत झळकली होती, पण खऱ्या अर्थाने ती ‘मोहिनी’ बनली ‘तेजाब’च्या यशामुळे.( Actress Madhuri Dixit)

चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात गेलं या आयकॉनिक डान्स नंबरला. पण या यशाचा पहिल्याच क्षणी अनुभव मात्र माधुरीने भारतात नव्हे, तर अमेरिकेत घेतला. बहिणीच्या लग्नासाठी अमेरिकेत गेलेल्या माधुरीला अचानक एका फोन कॉलवरून समजते की तिचा चित्रपट किती हिट ठरला आहे. तेव्हा क्षणभर तिला विश्वासच बसला नाही… पण हेच ते वळण होतं जिथून सुरू झाला तिचा स्टारडमचा प्रवास.

भारतात परतल्यानंतर पहिल्यांदाच विमानतळावर दोन लहान मुलांनी तिला ओळखल, आणि विचारलं, “तू एक दो तीन मधली आहेस ना?” असं म्हणत ऑटोग्राफ मागितला. माधुरी म्हणते त्या वेळेस “माझं आयुष्य त्या क्षणाला खरंच बदललं.” माधुरी आणि अनिल कपूर यांची ‘तेजाब’मधून समोर आलेली जोडी पुढे ‘पुकार’, ‘परिंदा’सारख्या चित्रपटांतही गाजली. बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट ऑनस्क्रीन जोड्यांमध्ये त्यांची जोडी गणली जाऊ लागली. (Actress Madhuri Dixit)
=============================
==============================
प्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये माधुरीने अजून एक आठवण शेअर केली, ‘किस्मत से’ चित्रपटाच्या एका गाण्याचं शूटिंग थेट अलास्कामध्ये, -३० अंश तापमानात झालं होतं. शिफॉन साडी नेसून थंडीने थरथरत ती शेवटी रडायला लागली होती. पण तिच्या चेहऱ्यावर तेव्हा हसू होतं कारण तिचं काम ती मनापासून करत होती. आज, ‘मोहिनी’ ही केवळ एक व्यक्तिरेखा नाही, तर माधुरीच्या स्टारडमचा प्रारंभबिंदू आहे. आणि ‘एक दो तीन’ हे केवळ एक गाणं नाही – तर लाखोंच्या हृदयात आजही धडकणारं माधुरीचं गाण आहे.