Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Raanjhanaa : AI च्या मदतीने बदलला चित्रपटाचा शेवट; दिग्दर्शक आणि इरॉस यांच्यात पेटला वाद

 Raanjhanaa : AI च्या मदतीने बदलला चित्रपटाचा शेवट; दिग्दर्शक आणि इरॉस यांच्यात पेटला वाद
मिक्स मसाला

Raanjhanaa : AI च्या मदतीने बदलला चित्रपटाचा शेवट; दिग्दर्शक आणि इरॉस यांच्यात पेटला वाद

by रसिका शिंदे-पॉल 31/07/2025

२०१३ मध्ये रिलीज झालेल्या आनंद राय यांच्या ‘रांजना’ (Raanjhanaa) चित्रपटाची आजही १२ वर्षांनी तितकीच क्रेझ तरुणाईत आहे… धनुष आणि सोनम कपूरच्या अभिनयासोबतच चित्रपटाची कथा आणि गाणी म्हणजे प्रेक्षकांना भावलेली एक जमेची बाजू… रांजना हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत रिलीज झाला होता… आणि आता तब्बल १२ वर्षांनी पुन्हा एकदा रि-रिलीज होणार असून चित्रपटाचा शेवट AI च्या मदतीने बदलण्यात आला आहे… आणि एका नव्या Ending सोबत १ ऑगस्ट २०२५ रोजी हा चित्रपट तमिळ भाषेत रि-रिलीज होणार आहे… मात्र, मुळ ‘रांजना’चा शेवट बदलण्यात आल्यामुळे इरॉस फिल्म्स विरुद्ध दिग्दर्शक आनंद एल रॉय असा नवा वाद सुरु झाला आहे…(Bollywood News)

दरम्यान, रांजना या चित्रपटाचे इरॉस कंपनीकडे कॉपी राईट्स आहेत. मात्र, दिग्दर्शक असूनही माझ्या चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला आणि त्याबद्दल त्यांनी माझ्याशी काहीही चर्चा केली नसल्याची नाराजी आनंद यांनी व्यक्त केली आहे…. ते असं म्हणाले की, “रांझना चित्रपटावर लोकांचं प्रेम आहे. या चित्रपटाने लोकांच्या मनात १२ वर्षांपासून घर केलं आहे. आता मला हे कळत नाही की मला म्हणजेच चित्रपटाच्या दिग्दर्शकाला विश्वासात न घेता हे काय चाललं आहे? रांझना या चित्रपटातून एक शोकांतिका मांडली होती. आता लोकांच्या भावनांशीही तुम्ही खेळ करणार आहात का? चित्रपटाचा खरा आवाज म्हणजे चित्रपटाचा शेवट आहे. तुम्ही चित्रपटाचा शेवट तुमच्याकडे हक्क स्वाधीन आहेत म्हणून एआयच्या मदतीने बदलत आहात. हे करणं म्हणजे चित्रपटाचा आत्मा बदलण्यासारखं आहे’. (Entertainment)

दिग्दर्शक आनंद राय द स्क्रीनशी चर्चा करताना म्हणाले, “काही कोटींच्या कमाईसाठी हे लोक दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांनी केलेल्या कलाकृतीशी छेडछाड करत आहेत. टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करा त्याचं स्वागत करु. मात्र, हे जे काही चाललं आहे ते धोकादायक आहे. उद्या मनात आलं तर लोक ‘शोले’ (Sholay) चित्रपटात जय आणि वीरु दोघांनाही जिवंत राहिलेलं दाखवून चित्रपटाचा क्लासमॅक्सच बदलतील”, अशीही भीती आनंद एल रॉय यांनी बोलून दाखवली.

तर, या वादावर इरॉस फिल्म्स कंपनीचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप द्विवेदी म्हणाले की, “इरॉसकडे चित्रपटाचे हक्क स्वाधीन आहेत. आमच्याकडे चित्रपटाचा विशेष कॉपीराईट आहे. धनुष, सोनम कपूर तसंच इतर कलाकारांनी यासंदर्भातल्या करारावर सह्या केल्या आहेत. जो बदल आम्ही करत आहोत, ती एक सकारात्मक रचना आहे. आम्ही संपूर्ण चित्रपट बदललेला नाही फक्त शेवटचे काही प्रसंग बदलले आहेत. एआयच्या मदतीने हा बदल करण्यात आला असून आम्ही एआयच्या मदतीने बदल केला असला तरीही एआय हे सावधगिरीने वापरण्याचं टूल आहे. रांझना चित्रपटाचा जरी शेवट बदलला असला तरी मूळ संकल्पनेत कोणताही बदल केला नाही आहे”.

================================

हे देखील वाचा: Border 2 मध्ये वरुण धवनसोबत झळकणार ही अभिनेत्री!; अर्जून रामपाल सोबत केलं आहे काम….

=================================

आता, ‘रांजना’ चित्रपटाचा नेमका शेवट काय असणार? आणि प्रेक्षक तो स्वीकारणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे… दरम्यान, लवकरच रांजना चित्रपटाचा सीक्वेल तेरे इश्क मे येणार असून यात धनुष आणि क्रिती सेनॉन मुख भूमिकेत झळकणार आहे… तर. २०१३ मध्ये आलेल्या रांजना चित्रपटात धनुष, सोनम कपूर, अभय देओल, स्वरा भास्कर, मोहम्मद झीशान अय्युब यांच्या प्रमुख भूमिका होत्या…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: abhay deol anand l rai Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News Dhanush Entertainment eros kriti sanon latest bollywood news latest entertainment news Raanjhanaa movie sonam kapoor tree ishq mein
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.