
Milan movie : ‘मुबारक हो सबको समा ये सुहाना…’ गाण्याची भन्नाट जन्मकथा!
चित्रपटाची गाणी लिहिताना गीतकाराला कधी कधी अनपेक्षित पणे एखादा असा शब्द किंवा वाक्य सापडते की त्यावरून चक्क एक लोकप्रिय गाणं तयार होतं! गंमत म्हणजे एका आनंदाच्या क्षणी सापडलेलं हे वाक्य गीतकाराने नंतर एका दर्दभऱ्या गाण्याच्या मुखड्यात वापरले. या सुरुवातीच्या वाक्या पासून गाणे तयार झाले पण हे गाणे एक दर्द भरे गीत होते. म्हणजे आनंदाच्या सिच्युएशनला सापडलेल्या वाक्यातून एक अप्रतिम दर्द भरे गाणे तयार झाले. आहे ना गमंत? कोणता होता तो चित्रपट आणि कोणते होते ते गाणे? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. (Entertainment old movies)

ते गाणे १९६७ साली प्रदर्शित झालेल्या एका सुपर हिट सिनेमात होते. एल व्ही प्रसाद या दाक्षिणात्य निर्मात्याने Mooga Manasulu हा एक तेलगु सिनेमा १९६३ साली बनवला होता. हा सिनेमा तिकडे जबरदस्त हिट झाला. याच सिनेमाचा हिंदीत रिमेक ‘मिलन’ हा चित्रपट होता. सुनील दत्त, नूतन आणि जमुना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पुनर्जन्मावर आधारित होता. हा चित्रपट त्यातील गाण्यांमुळे आणि चित्रपटाच्या संगीतामुळे खूप गाजला. या चित्रपटातील ‘सावन का महिना पवन करे सोर….’ या गाण्याला त्यावर्षीचा बिनाका टॉपचा गौरव प्राप्त झाला. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती. तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. (Sunil Dutt)

आनंद बक्षी यांना हा चित्रपट मिळाल्याचा खूप आनंद झाला.आपल्यासोबत एल पी यांना हा सिनेमा मिळाला याचाही आनंद होताच. कारण त्या वेळी हे सर्व जण फिल्मी दुनियेत नवे होते. एल पी यांची ‘ पारसमणी ‘ (१९६३) या चित्रपटापासून कारकीर्द सुरू झाली होती. त्या नंतर दोस्ती, मि. एक्स इन बॉम्बे हे त्यांचे चित्रपट लोकप्रिय झाले. एक लोकप्रिय संगीतकार म्हणून त्यांची लोकप्रियता वाढत होती. एल व्ही प्रसाद यांनी जेव्हा त्यांना बोलावले आणि त्यांनी हा मूळ तेलगु चित्रपट दाखवला. आपल्याला या सिनेमाचा री मेक हिंदीत करायचा आहे हे सांगितले. मूळ साउथ चित्रपट पाहायला एल पी गीतकार आनंद बक्षी यांना देखील घेऊन गेले. त्यावेळेला संगीतकार एल पी यांना गाण्यातील चित्रपटातील गाण्याच्या जागा त्यांनी फायनल केल्या. एक मोठा बॅनर या निमित्ताने त्यांना मिळालं होतं. (Milan Movie)

या खास सिनेमाचा शो संपल्यानंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल बक्षी आपल्या गाडीतून घरी जात असताना आनंद बक्षी देखील खुशीत म्हणाले ,” आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. लकी आहे. हा क्षण खूप मोलाचा आहे. आपल्याला मोठी संधी मिळते आहे त्याचे सोने करूयात. ‘मुबारक हो सबको समा ये सुहाना….’ त्यांनी सहज हे वाक्य बोलून गेले पण हे वाक्य सर्वांना खूप आवडले. लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हणाले,” या वाक्यातून आपण एक चांगले गाणे बनवू शकतो.” नंतर जेव्हा ‘मिलन’ या चित्रपटाच्या गाण्याच्या सीटिंग्स सुरू झाल्या; त्यावेळी एका सिच्युएशनला एक दर्द भरे गाणे हवे होते. (Trending news)
===========
हे देखील वाचा : लहानपणी भातुकलीच्या खेळात मधुबाला नवरी व्हायची तर मदनमोहन नवरा आणि लग्न लावून द्यायचा किशोरकुमार !
===========
नूतनच्या लग्नामध्ये सुनील दत्त हे गाणे गातो अशी सिच्युएशन होती. त्यावेळेला त्यांना आनंद बक्षी यांचे गाडीतील शब्द आठवले. त्यांनी आनंद बक्षींना त्या वाक्याची आठवण करून दिली. ‘मुबारक हो सबको समाय सुहाना मै खुश हु मेरी आंसू पे न जाना मै तो दिवाना दिवाना दिवाना…’ सर्वांना हे शब्द खूपच आवडले आणि आनंद बक्षी झरझर पुढचे अंतरे लिहून काढले. इतके सुंदर गाणे लिहिल्यानंतर या गाण्यातील दर्द भरी भावना व्यक्त करण्यासाठी तितकाच भावस्पर्शी स्वर त्यांना हवा होता. सर्वांच्या मते मुकेश यांचे नाव फायनल झाले. मुकेश यांनी हे गाणे अतिशय सुंदर रीतीने गायले. अशा पद्धतीने अगदी हसत खेळत बोलता-बोलता उच्चारलेले एक वाक्य आणि त्यातून निर्माण झालेले हे गाणे अजरामर ठरले.(Entertainment news)