Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Akshaya-Vishal Wedding: ७ वर्षांच्या नात्याला आले यश! खास व्हिडिओ पोस्ट

Shahid Kapoor : “मला मराठीत काम करण्याची संधी मिळाली तर…”

Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे

Bigg Boss Marathi 6: टभाऊचा धक्का’मध्ये संतापाचा स्फोट; ‘उठा, निघा,

नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं Tighi मधील ‘शारदा सरिता’ गाणं

“Amitabh Bachchan यांनी रेखा यांना स्वीकारलं पहिजे”; राखी सावंतचं विधान

Filmalaya स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक!

“तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये”; Rakhi Sawant आणि सागरमध्ये

क्रांती लढ्यातील एका गीतातून बनले होते Gulzar यांचे ‘हे’ लोकप्रिय

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे गाणे!

 Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे गाणे!
बात पुरानी बडी सुहानी

Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे गाणे!

by धनंजय कुलकर्णी 14/02/2026

अभिनेते आणि दिग्दर्शक पी जयराज यांना 1980 साली भारतीय सिनेमातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. मूकपटापासून त्यांची अभिनयाची यात्रा सुरू होती. त्यांनी प्रतिमा (1945) या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते या सिनेमाचा नायक दिलीपकुमार होता! पी. जयराज यांनी भारतीय सिनेमाच्या तीन पिढ्यानसोबत काम केले. व्हि. शांताराम , मोतीलाल, पृथ्वीराज कपूर, अशोक कुमार यांच्या सोबत भूमिका केल्या. नंतरच्या पिढीच्या राजेंद्रकूमार (आस का पंछी ), धर्मेंद्र (जीवन मृत्यू), राजेश खन्ना (बहारो के सपने) पी जयरांज अमिताभ सोबत डॉन , शोले या सिनेमात चमकले होते! वयाच्या विसाव्या वर्षी त्यानी मूकपटातून अभिनयाची सुरुवात केली. रुवाबदार राज बिंडे व्यक्तिमत्व, भेदक नजर , खर्जातील आवाज या मुळे त्यांना विविध भूमिका साकारायच्या संधी मिळाल्या. अमरसिंग राठोड, पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप, शहजहान , टिपू सुलतान , हैदर अली या व्यक्तीरेखा त्यानी साकारल्या.

त्यांच्या एका चित्रपटातील गाण्याचा किस्सा आहे खरंतर जयराज यांना गाण्याचे अजिबात अंग नव्हते. मुळात त्यांना गायला येत नव्हतेच.  पण मुक पटाच्या नंतर जेव्हा सिनेमा बोलू लागला तेव्हा प्रत्येक कलाकाराला गाणं येणं कंपल्सरी झालं कारण तोवर प्लेबॅक सिंगिंग प्लेबॅक सिंगिंग ची पध्दत सुरू झाली नव्हती.  अभिनेता जयराज यांना तर अजिबात गायला येत नव्हते त्यामुळे त्यांची खूप अडचण झाली.  पहिले एक दोन सिनेमे न गाता निघून गेले पण 1933 साली आलेल्या  ‘पतित पावन’  या चित्रपटात मात्र त्यांना गावे लागणार होते।  या सिनेमाचे दिग्दर्शक फणी मुजुमदार होते तर संगीत प्रा बी आर देवधर यांनी दिले  होते.  जेव्हा आपल्याला या सिनेमात गायलाच लागेल हे निश्चित झालं तेव्हा जयराज यांनी एका गाण्याच्या शिक्षकाला आपल्या घरी बोलावलं आणि त्याच्याकडून रोज गाणं शिकू लागले.  

परंतु काही दिवसातच तो गाणारा शिक्षक वैतागला आणि तो जयराज यांना म्हणाला,”  सर तुमच्या आवाजामध्ये दर्द  नक्की आहे पण सूर अजिबात नाही !” यानंतर या सिनेमाचे संगीतकार बी आर देवधर यांनी जयरांज  यांना गायन शिकवायला सुरुवात केली.  ते देखील वैतागले.  पण शेवटी सिनेमाच्या शूटिंगची वेळ आली त्या काळात गाण्याचं वेगळं रेकॉर्डिंग होत नसे.  त्या काळात सिनेमाचे  शूट करतानाच गाणं देखील लाईव्ह रेकॉर्डिंग होत असे. वादक कलाकार कारण कुठेतरी झाडाच्या मागे, झोपडी च्या मागे लपून बसलेले असायचे आणि तिथून ते संगीत द्यायचे!  नायक किंवा नायिका त्या सूरावर लाईव्ह गाणे गायचे. ‘पतित पावन’ मधील गाण्याच्या  शूटिंगचा दिवस उजाडला.  जयराज पूर्ण तयारी निशी आले होते पण ते मनातून खूप नर्वस होते.  दिग्दर्शकाने ‘लाईट कॅमेरा ॲक्शन’ असे म्हटले आणि जयराज यांनी गायला सुरू केले. कुठेही स्वर  आणि सूर यांचा मिलाफ होत नव्हता! तीन मिनिटाचे गाणे  म्हणजे जर जयराज यांना तीन तपा इतकी मोठी भयंकर  शिक्षा वाटले! अखेर गाणं संपलं.  

================================

हे देखील वाचा : Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

================================

दिग्दर्शकांनी कट असे म्हटले.  सर्व बादक कलाकार जोरजोरात हसू लागले कारण या गाण्यांमध्ये कुठेही सूर आणि स्वर यांचा संगम झालेला दिसला नाही.  त्यामुळे जयरांज यांनी कानाला खडा लावला आणि ठरवले ,”माझ्या आयुष्यातील हे पहिले आणि शेवटचे गाणे यानंतर मी आयुष्यात कधीच गाणार नाही!!”  आणि हे व्रत त्यांनी तंतोतंत पाळले. जयराज स्वतः कधी गायले नाही पण त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी खूपच मधुर आणि स्मरण रंजन करणारी आहेत.  परवर दिगारे आलम तेरा ही है सहारा (हातीमताई ) ढलती जाये रात सुनले दिल की बात (रजिया सुलतान) ही गाणी आजही रसिकांच्या दिलात ताजी आहेत . त्यांच्या जीवनाचा गौरव करण्यासाठी, तेलंगणा सरकारने २०१८ मध्ये ‘जयराज यांचा जीवनप्रवास’ नावाची एक तासाची documentary  तयार केली.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ashok kumar Bollywood Celebrity dadasaheb phalke dadasaheb phalke award Entertainment p jayraj prithviraj kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.