‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!
हिंदी चित्रपटसृष्टीचा ५०-६० दशकांचा काळ आपल्या अभुतपूर्व अभिनय आणि डायलॉग्स बोलण्याच्या अनोख्या शैलीने गाजवणारे अभिनेते म्हणजे राज कुमार (Raaj Kumar)… ‘मदर इंडिया’, ‘पाखिजा’, ‘कर्मयोगी’, ‘तिरंगा’, ‘मरते दम तक’ असे अनेक सुपरहिट चित्रपट राज कुमार यांनी दिले… आपल्या अभिनयाच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या राज कुमार यांनी मरण्यापूर्वी एक वेगळीच इच्छा व्यक्त केली होती हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊयात…(Bollywood News)

तर, राज कुमार यांनी त्यांच्या अंत्यविधीला कुणी येऊच नये अशी इच्छा मरण्यापूर्वी सांगितली होती…राज कुमार यांचं खरं तर फार अकाली निधन झालं…घश्याच्या कॅन्सरमुळे १९९६ मध्ये मुंबईत त्यांनी शेवटचा श्वास घेतला… त्यांना त्यांच्या निधनाची चाहूल लागली होती असं सांगितलं जातं… त्यामुळे एक दिवस त्यांनी कुटुंबातील लोकांना बोलावलं आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की, ‘माझं निधन झाल्यानंतर त्याविषयी कोणाला काही सांगू नका. मला अग्नी द्या आणि माझा अंत्यविधी करा. त्यानंतर लोकांना माझ्या निधनाची बातमी द्या.’ राज कुमार यांचा अंत्यविधी कुठे आणि कधी झाला याची अधिकृत माहिती कुणालाच नाही आहे. शेवटचा श्वास घेण्याआधी त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेप्रमाणे त्यांच्या कुटुंबानं गुपचूप त्यांच्या पार्थीवावर अंत्यविधी केला. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Marathi in Hollywood : हॉलीवूडमधला मराठी तडका!
=================================
राज कुमार हे अभिनय क्षेत्रात यशस्वी कारकिर्द घडवण्यापूर्वी मुंबई पोलिस खात्यात सब-इन्स्पेक्टर या पदावर नोकरी करत होते..मिळालेल्या माहितीनुसार १९४० सालात त्यांची पोस्टिंग माहिम पोलिस स्थानकात होती….मात्र, तुम्ही एक्टिंग केली पाहिजे असा सल्ला त्यांना कुणीतरी दिला आणि नोकरी सोडून त्यांनी अभिनयाचा प्रवास सुरु केला… १९५२ साली रंगेली या चित्रपटातून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली…(Latest Bollywood News Update)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi