Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form)

Kantara 1 ओटीटीवर कधी येणार?

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।; Abhanga Tukaram

Chiranjeevi Hanuman – The Eternal या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार राजेश

…जेव्हा नीतू कपूर यांनी Rishi Kapoor यांच्या अफेअर्सना One Night

Prasad Jawade आणि अमृताने अचानक सोडले राहते घर,व्हिडिओ पोस्ट करत

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अभिनेता धर्मेंद्रने असे पूर्ण केले बिमल रॉय यांचे अधुरे स्वप्न… 

 अभिनेता धर्मेंद्रने असे पूर्ण केले बिमल रॉय यांचे अधुरे स्वप्न… 
बात पुरानी बडी सुहानी

अभिनेता धर्मेंद्रने असे पूर्ण केले बिमल रॉय यांचे अधुरे स्वप्न… 

by धनंजय कुलकर्णी 19/09/2022

अभिनेता धर्मेंद्रने सिनेमाच्या दुनियेत इतरांना मदत केल्याचे अनेक किस्से सिनेमातील जाणकार मंडळी कायम सांगत असतात. पण अगदी सुरुवातीच्या काळात धर्मेंद्रला एका मराठी कलाकाराने मोठी मदत केली होती. ज्यामुळे त्याचा पुढचा प्रवास सुखकर झाला. त्याचा एक रंजक किस्सा आणि त्याचबरोबर धर्मेंद्रने ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांचे अधुरे स्वप्न कसे पूर्ण केले याची देखील एक सुखद आठवण आहे. हे दोन्ही किस्से एकमेकांशी ‘इंटर कनेक्टेड’ असल्यामुळे आपण सुरुवातीला धर्मेंद्रला मदत केलेल्या एका मराठी कलाकाराचा किस्सा बघूयात. (Untold story of Dharmendra & Bimal Roy)

आयुष्याच्या वळणावर एखाद्या छोट्या व्यक्तीने केलेली मदत देखील भाग्योदय करून टाकणारी असते. अभिनेता धर्मेंद्रला एका मराठी कलाकाराने मदत करून त्याची कारकिर्द घडविण्यास मोठा हातभार लावला होता. १९६० सालच्या ’दिल भी तेरा हम भी तेरे’ पासून धर्मेंद्रच्या अभिनयाची यात्रा चालू झाली. 

रमेश सैगल यांच्या ’शोला और शबनम’ (१९६१) चित्रपटाचं शूटींग चालू होतं. धर्मेंद्र आता मोठ्या बॅनरच्या सिनेमात काम मिळेल का, हे शोधत होता. त्याच वेळी त्याला बिमल रॉय त्यांच्या आगामी ’बंदिनी’ करीता एका नव्या चेहर्‍याच्या शोधात आहेत असे समजले. तो तडक बिमलदा यांना जावून भेटला. बिमलदांनी त्याचं काम अजून पाहिलं नव्हतं. त्यांनी धर्मेंद्रला तू सध्या काम करीत असलेल्या सिनेमाचे काही सीन्स आणून दाखव ते काम बघून मगच मला विचार करता येईल’ असं सांगितले. 

धरम रमेश सैगलकडे गेला व शूट झालेल्या एक दोन रिळांची मागणी केली. त्यावेळी रमेश सैगल भडकले ते म्हणाले “बिमलदा कितीही मोठे असले तरी मी कुणी ऐरागैरा नाही. सिनेमा इंडस्ट्रीत माझीही एक पोझिशन आहे. माझ्या अंडर प्रॉडक्शन सिनेमाची रिळे मी कुणालाही दाखवत नाही. देणार तर मुळीच नाही!” झालं… धर्मेंद्र निराश झाला. रडकुंडीला आला. आता बिमलदांना काय दाखवायचे? कुठेतरी आशेचा एक किरण दिसत होता तो देखील लुप्त झाला. (Untold story of Dharmendra & Bimal Roy)

दु:खी मनाने तो स्टुडिओच्या बाहेर पडत असताना एक हात त्याच्या पाठीवर पडला. तो हात रमेश सैगलच्या ’शोला और शबनम’चे संकलक अनंत आपटे याचा होता. तो धरमला म्हणाला, “तू अजिबात काळजी करू नको. मी संकलक असल्याने सर्व रिळे माझ्या ताब्यात असतात. त्यातली काही रिळे कुणालाही कळू न देता मी तुला देतो. ती तू बिमलदांना दाखव.” असं म्हणत त्याने ती रिळं गुपचूपपणे धरमला दिली. बिमलदांनी बघितली आणि..रेस्ट इज हिस्ट्री! हा अनंत आपटे म्हणजे मराठी सिनेमात तोतरे बोलून हसविणार्‍या मधू आपटेचा भाऊ होता. त्या अर्थाने अनंत आपटे धरमचा भाग्यविधाता ठरला. 

‘बंदिनी’ हा चित्रपट १९६३ साली प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर अभिनेता म्हणून धर्मेंद्र रसिकांच्या आणि व्यावसायिकांच्या नजरेत आला. तिथून त्याच्या रुपेरी कारकीर्दीचा यशाचा आलेख कायम चढता राहिला. बिमल रॉय धर्मेंद्र साठी खऱ्या अर्थाने गुरु ठरले. ‘बंदिनी’ नंतर बिमलदा यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी नायक म्हणून धर्मेंद्रलाच घेतले. नायिका शर्मिला टागोर होती. बिमल रॉय यांचा हा ‘चैताली’ (आधी या सिनेमाचे नाव ‘सहारा’ होते.) हा चित्रपट  बंगाली लेखिका अन्नपूर्णा देवी यांच्या कादंबरीवर आधारित होता. 

चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले पण दुर्दैवाने दिग्दर्शक बिमलदा यांचे निधन झाले आणि चित्रपट अर्धवटच राहिला. लोक आपापले पेमेंट घेवून हळूहळू या चित्रपटातून दूर जावू लागले. शर्मिला देखील बाहेर पडली.  पण बिमल दा यांची पत्नी मनोबिना रॉय हिला मात्र हा आपल्या पतीचा अर्धवट राहिलेला प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता. पण प्रश्न पैशाचा होता. (Untold story of Dharmendra & Bimal Roy)

बरीच वर्ष निघून गेली. त्यानंतर एक दिवस अचानक धर्मेंद्र याला ही बातमी कळाली आणि आपल्या गुरुचे अर्धवट स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायला पाहिजे याची त्याला जाणीव झाली. त्याने मनोमन निश्चय केला. एक दिवस बिमल रॉय यांच्या घरी तो पोहोचला. बिमलदा यांच्या पत्नीला वाटले की इतर कलावंत प्रमाणे धर्मेंद्र देखील त्याच्या चित्रपटाचे उर्वरित पेमेंट घेण्यासाठी आला आहे. पण कुणी काही बोलण्याच्या आतच धर्मेंद्रने एक ब्रिफकेस बिमलदा यांच्या पत्नीच्या हाती दिली. या ब्रिफकेस मध्ये पैसे होते. 

===============

हे ही वाचा: भारताच्या माजी पंतप्रधानांनी वाचवले होते डिंपल कपाडियाचे प्राण

आवर्जून पाहावेत असे ‘अंडररेटेड’ मराठी चित्रपट 

================

धर्मेंद्र विमलदांच्या पत्नीला म्हणाला, “माझ्या गुरुचा अर्धवट राहिलेला चित्रपट आपण पूर्ण करूया. हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी लागणारा सर्व खर्च मी करायला तयार आहे. तुम्ही कुठलीही काळजी करू नका. बिमलदांचे अधुरे स्वप्न आपण पूर्ण करूया..” मनोबिना रॉय यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. धर्मेंद्रच्या रूपाने जणू देवच त्यांच्या मदतीला आला होता. (Untold story of Dharmendra & Bimal Roy)

त्याने पुन्हा नव्याने पुन्हा चित्रपटाची सुरुवात केली. आता चित्रपटाची नायिका म्हणून त्याने सायरा बानोची निवड केली. दिग्दर्शक म्हणून बिमलदांचे सहाय्यक असलेले ऋषिकेश मुखर्जी यांना पाचारण केले. बिमल रॉय प्रोडक्शनची संपूर्ण टीम पुन्हा एकदा कामाला लागली. सर्वांना खूप आनंद वाटत होता. चित्रपट पूर्ण झाला आणि १८ सप्टेंबर १९७५  रोजी ‘चैताली’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. तो काळ ॲक्शन पटाचा होता. ‘चैताली’ सारख्या भावोत्कट कथानक असलेल्या चित्रपटांचा तो काळ नव्हता. त्यामुळे या सिनेमाला यश मिळाले नाही. पण धर्मेंद्रला एक समाधान नक्की मिळाले की, ज्या कलावंतामुळे मी आज या पोझिशनला आहे त्या कलावंताचे अधुरे स्वप्न मी पूर्ण करू शकलो. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Dharmendra Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.