‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Mili Movie : प्रेमाची वेगळी परिभाषा
हिंदी चित्रपटातील प्रेम ही कधीच न आटणारी/ ओहोटी नसलेली हवीहवीशी वाटणारी बहुरंगी गोष्ट. हिंदी चित्रपट निर्मितीत प्रेमपटांची संख्या जास्त भरेल.कित्ती सांगावेत तरी कमीच. आणि मग त्यात प्रेमगीत,प्रियकराच्या भेटीच्या ओढीचे गीत,कधी विरह गीत , एखाद्या प्रेमाच्या गोष्टीचा शेवट गोड तर एखाद्या प्रेमाच्या गोष्टीचा शेवट दुर्दैवाने शोकांतिका, प्रेमाचे संवाद,प्रेम गीत यांचे पीक तर अफाट. पडद्यावरचे प्रेम पाहून पाहून प्रेमवीर घडले. आणि यात ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘मिली’ चित्रपटातील प्रेमाची गोष्ट आणखीनच वेगळी. जगावेगळी म्हटलं तरी चालेल. मुंबईत हा चित्रपट २० जून १९७५ रोजी प्रदर्शित झाला. म्हणजेच या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबईत मेन थिएटर नॉव्हेल्टीत या चित्रपटाने साधारण स्वरुपाचे यश संपादले. (Classic bollywood movies)

हे प्रेम अगदीच वेगळे. एका अतिशय दुर्धर आजाराने ग्रस्त असलेली मिली (जया बच्चन) आपल्या आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टींचा आनंद घेतेय.मैत्रीणीत रमतेय. अशातच त्याच सोसायटीत राहायला आलेला शेखर दयाल (अमिताभ बच्चन) हा आपले एकटेपण घालवण्यासाठी नियमित थोडेसे मद्यपान करतो. त्याला मिलीच्या आयुष्याबद्दल तिच्या वडिलांकडून (अशोक कुमार) समजते आणि तिच्याबद्दल शेखर दयाल याला सॉफ्ट कॉर्नर वाटू लागतो. त्यातून त्यांचे प्रेमाचे एक वेगळे नाते निर्माण होते आणि मिलीला चांगले उपचार मिळावेत म्हणून शेखर तिला विदेशी घेऊन जातो….(Entertainment news)

ही गोष्ट बिमल दत्ता व डॉ राही मासूम रझा यांनी लिहिली आहे. हसत खेळत खेळत भावनिक होणारी अशी ही गोष्ट आहे. ह्रषिकेश मुखर्जी यांनी अतिशय उत्कटपणे ती साकारली. चित्रपटात उषा किरण, सुरेश चटवाल, शुभा खोटे, अरुणा इराणी इत्यादींच्याही प्रमुख भूमिका आहेत. छायाचित्रण जयवंत पाठारे यांचे आहे. चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे योगेश यांच्या गीतांना सचिन देव बर्मन यांचे श्रवणीय संगीत. आये तुम याद मुझे (पार्श्वगायक किशोर कुमार), बडी सुनी सुनी है (किशोर कुमार), मैने कहा फुलो से (लता मंगेशकर) ही गाणी कधीही ऐकावीत,अगदी प्रसन्न वाटते.(Bollywood Untold Stories)
================================
हे देखील वाचा: Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….
=================================
‘मिली’ चित्रपट म्हणजे दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी यांनी आपल्याच ‘आनंद'(१९७१) ची नायिकाप्रधान गोष्ट साकारली असे म्हटले गेले. वरकरणी तथ्य दिसते. ‘आनंद'(राजेश खन्ना)आपल्याकडे आता मोजकेच आयुष्य शिल्लक असून त्या दिवसांचा अधिकाधिक मनसोक्त मनमुराद आनंद घ्यावा असे त्याला मनापासून वाटते. उर्वरित आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याला भरभरुन जगायचाय. त्यातून तो जगण्याचे तत्वज्ञान सांगतो. ‘मिली’चीही तीच भावना आहे. पण तिला नवीन शेजारी आल्याने एक भावनिक आधार मिळतो. आणि त्यातून उपचाराचा मार्ग सापडतो. ‘आनंद’चित्रपटाचा शेवट पाहून अनेकांचे डोळे पाणावतात. आजही म्हणजे चित्रपटाला तब्बल चौपन्न वर्ष होवूनही तो हेलावून सोडतो. ‘मिली’ अंतर्मुख करतो. असे चित्रपट आजच्या काळात निर्माण होणे आवश्यक असले तरी अवघड. (Entertainment Tadaka)

ह्रषिकेश मुखर्जी यांची जया भादुरीवर विशेष माया. त्यांनीच पुण्यातील दूरदर्शन व चित्रपट अभिनय प्रशिक्षण संस्थेतून जया भादुरीला ‘गुड्डी’ (१९७१)तून चित्रपट क्षेत्रात आणले. त्यानंतर त्यांच्या ‘बावर्ची’ (१९७२),’अभिमान’ (१९७३), ‘चुपके चुपके’ (१९७५), ‘मिली’ (१९७५) या चित्रपटात जया बच्चन आहे. दरम्यान जया भादुरीची जया बच्चन झाली. ह्रषिदांची अमिताभ बच्चनवरही खास मर्जी. ‘बावर्ची’चे निवेदन आणि ‘गोलमाल’ (१९७९) या चित्रपटात अमिताभ पाहुणा कलाकार. तसेच ह्रषिदांच्या ‘आनंद’ (१९७१), ‘नमक हराम’ (१९७३), ‘अभिमान’ (१९७३),’मिली’ (१९७५), ‘आलाप’ (१९७७), ‘जुर्माना’ (१९७९), ‘बेमिसाल’ (१९८२) या चित्रपटात अमिताभ आहे. (Hrishikesh Mukherjee movies)
================================
हे देखील वाचा: Jaya Bachchan : …म्हणून जया बच्चन ‘सिलसिला’च्या सेटवर रोज जायच्या!
=================================
दिग्दर्शक व कलाकार अशा जोडीत हीदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण जोडी. सहज म्हणून सांगतो,गुलजार यांनी आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात जितेंद्र व विनोद खन्ना यांना सातत्याने संधी दिली (पण राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांना आपल्या दिग्दर्शनातील कोणत्याच चित्रपटात संधी दिली नाही) तर ह्रषिकेश मुखर्जी यांनी राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले, पण आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात जितेंद्र व विनोद खन्ना यांना कधीच संधी दिली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आनंद’,’बावर्ची’,’नमक हराम’ व ‘नौकरी’ या चित्रपटात राजेश खन्ना आहे.) या सगळ्यात ‘मिली’ वेगळा. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत १९७५ साल हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण. हे असे अधोरेखित होत आहे.