Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

ऋषीकपूर – नीतू सिंगची गुलकंदी लव्हस्टोरी !

 ऋषीकपूर – नीतू सिंगची गुलकंदी लव्हस्टोरी !
बात पुरानी बडी सुहानी

ऋषीकपूर – नीतू सिंगची गुलकंदी लव्हस्टोरी !

by धनंजय कुलकर्णी 12/06/2024

सत्तरच्या दशकातील लोकप्रिय रोमँटिक जोडी म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू सिंग. त्या काळातील तरुणाईला या जोडीने अक्षरशः वेड लावले होते. या दोघांची पडद्यावरची आणि पडद्यामागची केमिस्ट्री इतकी परफेक्ट होती की त्यांच्या चित्रपटाला सारी तरुणाई वेड्यासारखी गर्दी करत असे. ऋषी कपूर आणि नीतू सिंग हे पहिल्यांदा १९७३ साली भेटले ‘जहरीला इंसान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी. ऋषी कपूर (Rishi kapoor) हा पहिल्यापासून चॉकलेट बॉय इमेज असलेला कलाकार. सहनायिका नीतू सिंगसोबत त्याचे फ्लर्टिंग या सिनेमापासून सुरु झाले.

ऋषी कपूरचा या रिलेशनकडे पाहण्याचा खूपच कॅज्युअल अप्रोच होता. नीतू सिंग मात्र पहिल्यापासून त्याच्याबाबत सिरियस होती. पण ऋषी कपूर (Rishi kapoor) मात्र तितका तिच्यात इन्व्हॉल नव्हता. तो नीतू सिंगला म्हणायचा, ”आपली मैत्री अशीच राहील. लग्न वगैरे करून नको बंधनात अडकायला!” १९७५ साली ऋषी कपूर आणि नीतू सिंग यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी काश्मीरला गेले होते. काश्मीरची गुलाबी थंडी तिथंलं रोमँटिक वातावरण या दोघांना आणखी जवळ करून गेलं.

पण ऋषी कपूर मात्र भारी हा पठ्या काही  प्रेमाचा इजहार करतच नव्हता.  त्यानंतर ऋषी कपूर काश्मीरहून थेट पॅरिसला त्याच्या ‘बुलेट’ नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघून गेला. पॅरिससारख्या रोमँटिक शहरात मात्र त्याला आता नीतू सिंगची आठवण येत होती. त्याने तिथून तिला टेलिग्राम केला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात त्याने लिहिले होते ‘सिखनी, तेरी बहुत याद आती है’. हा ऋषीकडून प्रेमाचा पहिला संदेश होता.  नीतू सिंग आता आंतर बाह्य फुलून आली. कारण पहिल्यांदाच ऋषी कपूरने आपल्या प्रेमाचा इजहार केला होता. तिने धावत धावत जाऊन यश चोप्रा यांना तो टेलिग्राम दाखवला. पण प्रेमाची गाडी पुढे सरकत नव्हती.

ऋषी कपूर नंतर भारतात परत आला. ऋषी – नीतू यांचे चित्रपट आता प्रचंड यशस्वी होत होते. खेल खेल में, झूठा कही का, रफू चक्कर, धन दौलत, दुसरा आदमी, कभी कभी…. या दोघांच्या प्रेमाला आता चांगलाच बहर आला होता. ऋषी कपूरची बहिण रितू नंदा हिला आपल्या भावाच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. तिने नीतू सिंगला कॉन्टॅक्ट करून कन्फर्मेशन मिळवले. ऋषी कपूर सहजासहजी एंगेजमेंटला तयार होणार नाही याची रितूला जाणीव होती.

तिने एक आयडिया केली. ती तेंव्हा दिल्लीत रहात होती. तिने दिल्लीला तिच्या घरी एक फॅमिली फंक्शन आहे म्हणून सर्व कपूर फॅमिलीला तिकडे बोलावून घेतले  तसेच नीतू सिंगच्या फॅमिलीला बोलावून घेतले. सर्व सिंग आणि कपूर फॅमिली एकत्र आल्यानंतर रितू सिंगने सरप्राईज देत ऋषी कपूर (Rishi kapoor) आणि नीतू सिंग यांचे एंगेजमेंट घडवून आणली! त्यानंतर २२ जानेवारी १९८० या दिवशी या दोघांनी लग्न केले.

या लग्नात मोठा धुमधडाका होता. सेलिब्रिटींचे लग्न त्यामुळे अख्ख बॉलीवूड लग्नाला उपस्थित होते. पाकिस्तान म्हणून खास एका मशहूर कव्वाली गायकाला बोलवलं होतं. रात्रभर त्याच्या कव्वालीचा कार्यक्रम चालला. कव्वाली गाणारा हा कलाकार होता नसरत फतेह अली खान. हा त्यांचा भारतातील पहिला परफॉर्मन्स होता. इथूनच त्यांची भारतीय चित्रपट संगीतात एन्ट्री झाली. या लग्नात आणखी एक अभूतपूर्व गोष्ट घडली. या लग्नाच्या निमित्ताने दिलेल्या पार्टीला नर्गीसने आपले पती सुनील दत्त आणि पुत्र संजय दत्तसोबत हजेरी लावली. ‘जागते रहो’ या सिनेमाच्या शूट नंतर तब्बल २४ वर्षानी राज – नर्गीस एकत्र आले.

=========

हे देखील वाचा : तडप तडप के इस दिल की आह निकलती रही ….

=========

नाचगाणी, खाणंपिणं याची चांगल होती.  या पारंपारिक पद्धतीने झालेल्या लग्नात नीतू सिंग आणि ऋषी कपूर (Rishi kapoor) प्रचंड थकले होते. नीतू सिंगचा सुहागन का जोडा इतका वजनदार होता की त्याच्या ओझाने ती एकदा चक्क थकून अतिश्रमाने चक्कर येऊन पडली होती!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Entertainment lovestory neetu kapoor Rishi Kapoor Wedding
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.