Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai! मनात साठलेल्या भावना शब्दांत

Hemant Dome यांच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चित्रपटाने गाठला परदेश!

“काही निर्माते जास्त शेफारलेत…”; खोपकरांचा Digpal Lanjekar यांना धमकी वजा

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्री Durga Khote!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Indian Cinema :हिरो म्हणून साईन केलेला पहिला सिनेमा तब्बल २२ वर्षानी रिलीज झाला!

 Indian Cinema :हिरो म्हणून साईन केलेला पहिला सिनेमा तब्बल २२ वर्षानी रिलीज झाला!
बात पुरानी बडी सुहानी

Indian Cinema :हिरो म्हणून साईन केलेला पहिला सिनेमा तब्बल २२ वर्षानी रिलीज झाला!

by धनंजय कुलकर्णी 03/05/2025

हिंदी सिनेमाच्या दुनियेत पहिल्यांदा नायकाचा रोल मिळालेल्या अभिनेत्याचा हा  चित्रपट रिलीज मात्र त्याच्या मृत्यूनंतर झाला होता या संपूर्ण घटनेचा पिरेड हा तब्बल २२  वर्षांचा होता. हा चित्रपट बनायला प्रचंड वेळ लागला. चित्रपट निर्मितीच्या दरम्यान अनेक अडथळे आले. अनेकांचे मृत्यू झाले. शेवटी २२ वर्षानंतर हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला. त्यावेळेला या चित्रपटाचा नायक देखील या दुनियेत नव्हता!  म्हणजे ज्या नायकाने प्रमुख नायक म्हणून त्याचा पहिला चित्रपट साइन केला तोच चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला. कोण होता तो नायक आणि कोणता होता तो चित्रपट? तो अभिनेता होता संजीव कुमार (Sanjeev Kumar). खूप इंटरेस्टिंग असा  हा किस्सा आहे. (Bollywood untold stories)

संजीव कुमार गुजराती आणि हिंदी रंगभूमीवरील एक कसदार अभिनेते होते.  पण चित्रपटात काम मिळावं म्हणून साठच्या दशकाच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न होते. छोट्या-मोठ्या भूमिका मिळत होत्या पण नायक म्हणून चित्रपट मिळत नव्हता. संघर्ष चालू होता स्वत: ला सिद्ध करण्याचा.  ‘मुगल ए आजम’ हा चित्रपट ५ ऑगस्ट १९६० रोजी  प्रदर्शित झाला आणि सुपर हिट झाला. या सिनेमाचे  दिग्दर्शक के आसिफ यांनी त्याच लेव्हलचा एक आणखी भव्य चित्रपट बनवायचे ठरवले.  आता चित्रपटाचे कथानक लैला मजनू यांच्या वर होते. चित्रपटाचे नाव ठरलं ‘लव अँड गॉड’  या चित्रपटात नायक म्हणून त्यांनी अभिनेता गुरुदत्त यांना तर नायिका  म्हणून निम्मीला साईन केले.  चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले . (Indian cinema)

==============

हे देखील वाचा : Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

==============

या सिनेमात संजीव कुमार यांना देखील एक छोटी भूमिका दिली होती. के  असिफ अतिशय चोखंदळ. त्यामुळे प्रत्येक शॉट खूप विचार करून घेत असे. साहजिकच चित्रपटाच्या शूटिंग चा  स्पीड खूप कमी होता. चित्रपटाची काही रिळे बनल्यानंतर १० ऑक्टोबर १९६४ या दिवशी गुरुदत्त यांचे निधन झाले.(त्यांनी आत्महत्या केली) के  असिफ यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. कारण आता या भूमिकेत कोणाला घ्यायचे? हा प्रश्न निर्माण झाला होता. अभिनेता संजीव कुमार यांचा अभिनय ते पाहत होते. त्यांनी संजीव कुमारला मजनूच्या भूमिकेत घेतले.  आणि चित्रपटाची शूट सुरू झाले संजीव कुमार यांनी नायक म्हणून साईन केलेला हा पहिलाच चित्रपट होता. संजीव कुमार मजनू आणि निम्मी लैला हे तसं ऑड कॉम्बिनेशन होतं पण के असिफ यांनी निवड केली होती. चित्रपट चित्रीकरण चालू केले. निवांतपणे चित्रपट बनू लागला. नंतर संजीव  कुमार देखील हिंदी सिनेमात हळूहळू आपलं नाव सिद्ध करू लागला. मात्र त्याने साईन केलेला पहिला सिनेमा काही तयार च होत नव्हता.  (Entertainment news)

‘लव अँड गॉड’  या चित्रपटाचे शूटिंग खूपच मंद गतीने चालू होते. ९ मार्च १९७१ रोजी  दिग्दर्शक के  असिफ यांचे अनपेक्षित निधन झाले आणि चित्रपट बंदच पडला. नंतर त्यांची पत्नी अख्तर हिने सिनेमा पूर्ण करायचा ठरवले. तीन वेगवेगळ्या स्टुडीओ या सिनेमाचे शूट झाले होते. तिथून काही फुटेज गोळा केले. अक्षरशः आजच्या भाषेत कट पेस्ट करत  हा चित्रपट पूर्ण करण्याचे आले.के सी बोकाडीया यांनी या साठी मदत केली.  यादरम्यान अनेक कलावंतांचे निधन झाले होते पुन्हा पुन्हा रिशूट करावे लागल्याने सिनेमात विस्कळीत पणा आला होता.  ५ नोव्हेंबर १९८५ रोजी  अभिनेता संजीव कुमार यांचे देखील निधन झाले. २७ मे १९८६ रोजेई ‘लव अँड गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि फ्लॉप झाला. या सिनेमात म. रफी, तलत, लता, मन्नाडे, खान मस्ताना , हेमंत कुमार यांची गाणी होती. त्या काळात रेडीओ वर रेडीओ सिलोन वर हि गाणी रोज लागायची. (Bollywodd tadaka)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bolllywood movies Bollywood Bollywood Chitchat Celebrity News Entertainment Gurudatt Indian Cinema lata mangeshkar love and god movie Manna Dey mohammad rafi Mughal-E-Azam nostalagia sanjeev kumar superstar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.