Laxmikant Berde : जगाचा निरोप घेण्यापूर्वी ‘या’ दोन सहकलाकारांची आठवण

Seema Deo : ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चवथीच्या चंद्राची कोर!
५० आणि ६०च्या दशकातील पहिली पाच वर्षे मराठी चित्रपट हा बऱ्यापैकी शहरी कथानका भोवती फिरत असे. ६० च्या दशकाच्या मध्यावर ग्रामीण कथानक असलेले सिनेमे हिट होऊ लागले आणि मराठी सिनेमाचा ट्रेंड बदलला. १९६३ सालचा ‘मोलकरीण’ हा साने गुरुजींच्या कथेवरील गाजलेला चित्रपट. पू.साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळविला. त्यांच्याच कथानकावरील हा ‘मोलकरीन’ चित्रपट यशवंत पेठकर यांनी दिग्दर्शित केला होता. अतिशय भावस्पर्शी असा हा सिनेमा होता. या चित्रपटाच्या सर्व गाण्याचे ध्वनिमुद्रण झालं पण दिग्दर्शकाने पटकथेत थोडासा बदल करून आणखी एक गाणे टाकायचे ठरवले . हे गाणे ताबडतोब रेकॉर्ड करून हवे होते . त्यांनी संगीतकार वसंत देसाई तसं सांगितलं. ‘मोलकरीन’ ची गाणी ग दि माडगूळकर व पी सावळाराम यांनी लिहीली होती. वसंत देसाई लगेच कवी पी सावळाराम यांना भेटले. गाण्याची सिच्युएशन त्यांना सांगितली. (Marathi movies)

कॉलेजच्या गॅदरिंगला नायिका सीमा देव स्टेजवर कोळी नृत्य अगदी झोकात करते आणि ते पाहून नायक रमेश देव तिच्या प्रेमात पडतो. वसंत देसाई त्यावेळी पी सावळा राम यांना म्हणाले “या सिच्युएशन वर ताबडतोब एक गाणं लिहून हवे आहे.” त्यावर पी. सावळाराम म्हणाले “अहो या प्रसंगावर एक जण माझ्याकडे आधीच लिहिलेला आहे “वसंत देसाई म्हणाले,” अरे व्वा… हे तर उत्तम झालं!” (Seema Deo)

पी सावळाराम यांनी मग ते गाणं शोधून काढलं. वसंतरावांना दाखवलं. वसंतरावांना ते पसंत पडलं मात्र त्यातील पाच कडव्यांपैकी फक्त तीनच कडवी त्यांनी घेतली. आशा भोसले यांच्या आवाजातील ते गाणं प्रचंड गाजलं. आशाने काय भन्नाट गायलं आहे गीत. गंमत म्हणजे हे गाणं सावळाराम यांनी वीस वर्षांपूर्वी म्हणजे ते चित्रपटात येण्यापूर्वी १९४३ साली लिहिलं होतं.नंतर हे गाणे ते विसरून गेले होते. तब्बल वीस वर्षानी जेंव्हा दिग्दर्शकाने या सिच्युएशन सांगितली तेंव्हा त्यांना हे गाणे आठवले! (Entertainment)

या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकेवर सुरुवातीला गीतकार म्हणून चुकून ग दि माडगूळकर यांचे नाव पडलं होतं. (आजही अनेक वेब साईट वर या गीताचे गीतकार म्हणून गदीमा यांचेच नाव आहे.) पण चूक निदर्शनाला आणून दिल्यावर ती दुरुस्त करून पी सावळाराम यांचे नाव घेतले! म्हणजे गंमत पहा. दिग्दर्शकाला जर संपूर्ण गाणी रेकोर्ड झाल्यानंतर पटकथेत थोडा बदल केल्याने या गाण्याचा नंबर लागला. नसता कुणी सांगावे पी सावळाराम यांचे २० वर्षापूर्वी लिहिलेले गाणे कदाचित असेच अंधार गर्तेत पडले असते आणि रसिक एका चांगल्या गीताला मुकले असते. मधू पोतदार यांनी पी सावळाराम यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथात हि आठवण लिहिली आहे. (Bollywood news)
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
जाता जाता थोडंसं मोलकरीण या चित्रपटाबद्दल या चित्रपटात एकूण पाच गाणी होते यातील तीन गाणी यांनी लिहिली होती तर ग दि माडगूळकर यांनी दोन गाणी लिहिली त्यालाच मेहमूद आणि आशा भोसले यांच्या स्वरातील ‘हसले आधी कोणी तुका मी’ हे युगलगीत फार सुंदर बनले. हे गीत पी. सावळाराम यांनी लिहिले होते. पी सावळाराम यांनी लिहिलेली तीन गाणी या चित्रपटात होती. ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर’, ‘हसले आधी कुणी’ , ‘आणि देव जरी मज कधी भेटला….’ तर गदिमा यांनी या सिनेमासाठी दोन गाणी लिहिली होती. (Entertainment update)
‘दैव जाणिले कुणी’ आणि ‘एक वार मज राम दिसावा’ हा सिनेमा स्त्री वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता डोळ्यातून अखंड पाणी काढणारा हा चित्रपट होता. इतका सुंदर चित्रपट पण याला कुठलेही पारितोषिक मिळाले नाही. १९६३ सालचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट ठरला राजा ठाकूर दिग्दर्शित ‘रंगल्या रात्री अशा’. या वर्षी महाराष्ट्र राज्य पारितोषिक विजेते चित्रपट होते ‘रंगल्या रात्री अशा’(राजा ठाकूर),हा माझा मार्ग एकला (राजा परांजपे) आणि फकीरा (कुमार चंद्रशेखर). (untold stories)